सोमवार, २१ मार्च, २०११

निरूत्तर...

दहावीत 88 टक्के गुण मिळविल्यानंतर इंजिनियर होण्याच्या त्याच्या इच्छेने उचल खाल्ली नसती तर नवलच. पण आस्मानातून कहर कोसळला. बापाची तीन-चार एकर शेती कोसी नदीच्या उग्र रुपात स्वाहा झाली. हाय खाउन बापानं अंथरुण धरलं, आईने केंव्हाच जगाच निरोप घेतला होता. आठ वर्षाचा भाऊ, सहा वर्षांची बहीण आणि हाय खाऊन वेडापिसा झालेला बाप हे सगळं जेंव्हा असह्य झालं तेव्हा त्यानं सगळ्यांना घेऊन दिल्ली गाठली. दिल्लीच्या रस्त्यावरुन त्यानं सायकल रिक्षा चालवायला सुरुवात केली. गेली आठ वर्षे तो सायकल चालवितो आहे. स्वतःचं आणि कुटुंबाच पोट भरता भरता त्यानं बारावी केली. बारावीतही त्याचं नाणं खणकलं. केवळ पेनातली रिफिल संपली म्हणून त्याला वीस मार्कांचं लिहिता आलं नाही. अंगावरची कापडं पाहून कुणी पेन त्याच्याकडं भिरकविलाही नाही. पण तरीही ऐंशी टक्के


इंजिनिअर होण्याचं स्वप्न त्याच्या डोळ्यात दिसतं. सायकल रिक्षा चालविताना मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईतून तो छोट्या भावाचं आणि बहिणीचं शिक्षण, बापाच्या औषधपाण्याचा खर्च सर्व काही पाहतो. मधल्या काळात जेंव्हा दिल्लीत सायकल रिक्षांवर संक्रात आली तेंव्हा तो उपनगरांत आला. द्वारका या दिल्लीच्या उपनगरात तो सायकल चालवून उपजिविका करु लागला. रिक्षाच्या उजव्या बाजूला दहावीचं आणि डाव्या बाजूला बारावीचं मार्कलिस्ट प्लास्टीकच्या कागदात फ्रेम करुन त्यानं लावलं आहे. मला म्हणाला, साब आपही बतावो जहाँ महिने मे चार-पाच हजार कमाता था तब महँगाई नहीं थी दो हजार में घर चल जाता था. बाकी हम भाई-बहनों की पढाई और बाबा की दवादारु के लिए जाता. आजकल चार हजार भी पेट भरने के लिए काफी नहीं है. सबसे सस्ती सवारी लेकर चलता हूँ मगर फिर भी यह हालत है. इन मार्कलिस्ट का क्या करुँ.
मी काय बोलणार ? महिन्याचं बजेट बिघडू नये यासाठी रिक्षाच्या भावात घासाघीस करण्यासाठी उघडलेलं तोंड आपोआप मिटलं गेलं. त्याला मी काय सल्ला देउ ? नक्षलवादी हो म्हणू की तुझा हक्क हिरावून घेणाऱ्यांच्या (ज्यात माझाही समावेश होतो ) छातीवर पाय रोवून उभा रहा म्हणू......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: