सोमवार, २१ मार्च, २०११

पाठकजींचा पाठ

महाराष्ट्रात अशोक चव्हाण पायऊतार झाल्याचा आदर्श प्रस्थापित झाल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्याच्या निवडीचे झेंगाट दिल्लीतील पत्रकारांच्या माथी लागले. काँग्रेसच्या 26 अकबर मार्ग येथील कार्यालयात सुरु असणाऱ्या गुप्त बैठका, चर्चा इ. इ. चे वार्तांकन करता करता घरी पोहोचण्यासाठी रोजच रात्र होत होती. एकदा तर चक्क शेवटची रात्री साडे-अकराची मेट्रो पकडून घराकडे निघालो. सुदैवाने जागाही लगेचच मिळाली. जागा मिळताच मेट्रोच्या एकसुरात सुरु असलेल्या सुरावटीमुळे दिवसभराच्या श्रमाने चटकन झोपही लागली. या झोपेनेच दगा झाला आणि मी चक्क द्वारका सेक्टर 12 च्या स्टेशनवर उतरण्याऐवजी दोन स्टेशन पुढे आलो. परतीची ट्रेनही नाही आणि रस्त्यावर दुसरे कोणतेच वाहन उपलब्ध नाही अशा वेळी काय करावे या विचारातच मी आश्विनीला ( माझी पत्नी ) फोन लावला आणि घडलेला प्रकार सांगितला आणि माझ्या टेन्शनमध्ये तिलाही भागीदार करुन घेतले.
एवढा बाका प्रसंग पुढे ठाकला असताना दूरवर अंधारात एक रिक्षा उभा असलेला दिसला. मेट्रो स्टेशनच्या फ्लडलाईटसपासून अंमळ दूरच असलेल्या या रिक्षाचा एक चान्स घेण्यास काय हरकत आहे असा विचार मनाला स्पर्शून गेला आणि पावले आपसूकच तिकडे वळली. पाच ते दहा मिनिटांच्या आतच मी रिक्षाच्या जवळ पोहोचलो. त्यात एक प्रौढ वयाचा रिक्षावाला आपल्या अनंत श्रमाचा परिहार करीत शांतपणे पहुडला होता. दिवसभराच्या श्रमाने थकलेल्या माणसाला दोन घास पोटात जाताच कुठेही झोप लागते म्हणतात ना की, भुकेला कोंडा आणि नीजेला धोंडा.
''अरे भाई, चलोगे पॉकेट सिक्स जाना है... '' मी त्याला उठवित विचारले.
माझ्याकडे पाहत आळोखे-पिळोखे देत तो म्हणाला, " बाबूजी बडा लेट कर दिया आपने. अब तो चलना मुश्कील है मग फिर भी क्या दोगे " उशीरा आल्याची किंमत तर चुकवावी लागणार होतीच. नेहमीच्या स्टॉपपासून तब्बल साडेचार किलोमीटर निर्जन स्थानी पोहोचलो होतो त्यामुळे म्हणेल ती किंमत देण्याची तयारी होतीच.
मी म्हटले, ''तीस रुपया दूँगा."
त्यावर तो म्हणाला, "नहीं बाबूजी, बहुत कम दे रहे हो. पाच रुपैय्या और बढा लो." साठ रुपए अॅटोला देण्यापेक्षा पस्तीस रुपये रिक्षावाल्या देणे हा स्वस्तातील सौदा होता. त्यामुळे मी त्यास तत्काळ होकार दिला. बोचऱ्या थंडीत कुडकुडत मी मागे बसलो आणि रिक्षावाला पुढे रिक्षा चालवत होता.
पाचेक मिनिटांनी मी कुडकुडतच रिक्षावाल्याला विचारले, "भाईसाब आपका नाम क्या है. त्यावर तो म्हणाला जी ! शंकर पाठक नाम है जी मेरा."
" पंडत हो क्या ?" मी विचारले
त्यावर तो म्हणाला, "हाँ जी, पंडत है मगर आज कल कौऊन पंडत और कौऊन छोट जात सब एकही है. पर आपने कैसे पहचाना ?"
त्यावर मी म्हटले, "इतनी लंबी चोटी रखी है तो पहचान मे तो तुरंत आवोगेही."
त्यावर तो हसला. थोडा वेळ थांबून म्हणाला, "बाबूजी घर पहुँचने के लिए इतनी देर लगाना ठिक नहीं. आजकल जमाना बडा खराब है. थोडा जल्दी पहुँचा करो घर... "
मी म्हणालो, "क्या करे पाठकजी, झपकी आ गयी थी इसिलिए इतना बडा कांड हो गया."
थोडा वेळ शांततेत गेल्यावर अचानक समोरुन एक कार सुसाट वेगाने आली आणि रिक्षाच्या अगदी जवळून गेली. पाठक ने रिक्षा थांबविला. अचानक ब्रेक दाबल्यामुळे मी देखील थोडा पुढे आलो. गाडी दूरवर जात असल्याचे पाहून एक सणसणीत शिवी हासडत पाठक म्हणाला, "बाबूजी, बडी बाप की औलाद यह है. ना खुद की फिकीर ना दुसरों की चिंता. अगर आज कुछ हो जाता तो यह कमीना रुकता भी नहीं."
मी पण थोडा सर्द झालो होतोच, पाठकच्या समयसूचकतेचे कौतुक करुन मी म्हणालो, "पाठकजी यह तो बडा कांड हो जाता आज. "
त्यावर तो म्हणाला," जी क्या बताएँ, पिछले साल आशीर्वाद चौक के पास की गली में एक गाडी हमें ठोकर मारी. सवारी और हम दोनों जख्मी हो गए. खैर सवारी ने अपना इंतजाम किया मगर हम दुई घंटे तक वहीं पडे रहे आखिर एक रिक्षेवाले ने अस्पताल पहुँचाया. चार महिना अस्पताल में रहना पडा. पाच हजार रुपैय्या खर्चा आया और हाथ के पंजे के साथ पैर की चार उँगलीयाँ टुटी सो अलग."
मी चकीतच झालो आणि म्हणालो, "अरे फिर रिक्षा कैसे चलाते हो. त्यावर आपला बिनापंज्याचा हात माझ्याकडे दाखवत तो म्हणाला, बाबूजी हाथ का पंजाही तुटा है मगर पुरा हाथ तो सलामत है. जुगाड हो जाता है."
मी म्हणालो, पाठकजी, "आपको तो सलाम करना पडेगा. मगर इतना सब कुछ होने के बावजूद अपने गांव में ही कुछ करते तो बेहतर होता और क्या आप को हर्जाना नहीं मिला ?"
त्यावर तो म्हणाला, "हर्जाने की बात छोडीए साहब. पुलीस वालों ने हमको ही उल्टे हाथ ले लिया. एक हजार रुपैय्या दिया और बोला की मुँह बंद रखो वर्ना बिना लायसन्स का केस कर देंगे. मरता और क्या करता. चुप बैठ गया. लेकीन साब बेटी ब्याहनी है ना इस साल. दसवी पास कर रखा है उसने सिलाई-कढाई भी जानती है. अच्छे घर में जाएगी तो राज करेगी इसिलिए कर रहे है, ओढ रहें है. "
मी विचारले, "पाठकजी, कोई लडका-वडका नहीं ?"
त्यावर तो म्हणाला, "पकड के नसबंदी करवाई दिए थे कांग्रेसवाले हमारी. एकही औलाद है उसी को पढाए-लिखाए. मगर अब आगे नहीं पढा पा रहे इसिलिए शादी की सोच रहे है."
मी म्हटले वह तो संजय गांधी के जमाने में हुवा होगा ना, तो आपकी बेटी तो काफी बडी होगी. त्यावर तो शांत राहिला आणि थोड्या वेळाने म्हणाला, "बाबूजी शादी नहीं हुई थी हमारी जब नसबंदी करवाए थे. यह तो हमारी बीबी की बेटी है. गाँव के दोस्त के बेटी से शादी किए है, विधवा हो गयी थी एक बच्ची को जनने के बाद. बाप बेटी को देख भी नहीं पाया. नसीब के खेल है साब. अभी बस्स उसकी शादी करवानी है."
पाठकजीची कहाणी ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. मी म्हणालो, "पाठकजी आप महान है. आप के चरण छुने का मन कर रहा है."
त्यावर फक्त तो हसला. तेवढ्यात पॉकेट सिक्सच्या गेटवर रिक्षा येऊन पोहोचली. मी त्याला पन्नासची नोट दिली. त्याने पंधरा रुपये परत केले. मी म्हणालो, "पाठकजी, यह रुपए रखीए. बेटी के काम आएंगे." तो म्हणाला, "नहीं बाबूजी, जितना तय हुवा है उतना ही लेंगे."
मी शांतपणे पैसे घेतले आणि म्हणालो, "पाठकजी आप महान हो. त्यावर तो हसला आणि म्हणाला, साब मै महान नहीं बस्स एक मजबूर बाप हूँ. काश मेरी बेटी की शादी अच्छे घर में हो. अबतक कुछ रुपए जमा किए है. कुछ और करुँगा. चार महिने में हो जाएगा सब."
मी म्हटले उसके बाद क्या करोगे ? त्यावर तो शांत राहिला आणि म्हणाला, "पता नहीं...."
दूरवर जात असलेल्या पाठकजीच्या रिक्षाकडे तो अंधारात अदृश्य होईपर्यंत मी पाहत होतो. मला माझ्या पत्त्यावर आणून सोडणाऱ्या पाठकजींना पडणारा प्रश्न अर्थात मलाही सतावत होताच. कल क्या होगा. आणि उत्तर होते 'पता नहीं....."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: